Posts

Showing posts from September, 2021

आईची आठवण

 तुझी  आठवण जातच नाही आई मनातून माझ्या | किती तरी गोड त्या स्मृति, तुझ्या संगती, सदा राहतील ताज्या || घर भरलेले, मन भरलेले, आनंदाने गजबजलेले,  तू होतीस जेव्हा आई । आनंदाचे, अन दुःखाचे , सगळच बोलत होतो  तु होतीस जेव्हा आई । आता कुणाशीच नाही बोलणे, सारी कोंडले मी,हृदयात माझ्या ||  ते घर आता, उरले केवळ ,चार भिंती छपराचे असणे  ते गावही आता, वाटे परके, जिथे नाही तुझे बोलणे चालणे । जिथे त्रस्त मनाला, मिळेल विसावा ,अशी उरलीच नाही  या जगी कुठलीच जागा|| सुहास सदाशिव सांबरे 30.09.2020

आधीच हौस,त्यात पडला पाऊस

             माझा तसा नशीब  वगैरे गोष्टींवर विश्वास नाही पण आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की नशीब किंवा योगायोग म्हणून काही असतं की काय असं वाटू लागतं.माझ्या नशिबात सहलीला , फिरायला जाण्याचा योग नाही असं वाटावं अशा घटना घडत गेल्या त्या सगळ्या सांगतो. ' केल्याने देशाटन.... मनुजा चातुर्य येतसे फार ' असं खूप पूर्वी कवी मोरोपंत म्हणून गेले आहेत.यावरून तुमच्या लक्षात येईलच की मी फारसा कुठे फिरलेलो नाही म्हणजे मी चतुर,स्मार्ट वगैरे नाही,बरेच लोक मला सहजपणे फसवतात,पण ते जाऊ द्या,मूळ विषयावर येतो.तर याची सुरुवात आमच्या मराठी शाळेपासून झाली,1ली ते 7 वि मी झरेकाठी या गावात मराठी शाळेत शिकलो,पण संपुर्ण 7 वर्षात तिथे अगदी जवळ कुठेतरी का होईना पण सहल निघालीच नाही.मग तिथे पुढील वर्ग नसल्याने मी आश्वि च्या हायस्कूलला 8 वीला प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी आमच्या झरेकाठीच्या शाळेची 5 वि ते 7 वीच्या मुलांची 3 दिवसांची सहल किल्ले पाहण्यासाठी निघाली.      इकडे हायस्कूलला पण तीच तऱ्हा,मी 10 वि पास होईपर्यंत तीन वर्षात काहीतरी कारणाने एकही सहल निघाली नाही...