आईची आठवण

 तुझी  आठवण जातच नाही आई मनातून माझ्या |

किती तरी गोड त्या स्मृति, तुझ्या संगती, सदा राहतील ताज्या ||


घर भरलेले, मन भरलेले, आनंदाने गजबजलेले,

 तू होतीस जेव्हा आई ।

आनंदाचे, अन दुःखाचे , सगळच बोलत होतो 

तु होतीस जेव्हा आई ।

आता कुणाशीच नाही बोलणे, सारी कोंडले मी,हृदयात माझ्या ||


 ते घर आता, उरले केवळ ,चार भिंती छपराचे असणे 

ते गावही आता, वाटे परके, जिथे नाही तुझे बोलणे चालणे ।

जिथे त्रस्त मनाला, मिळेल विसावा ,अशी उरलीच नाही

 या जगी कुठलीच जागा||


सुहास सदाशिव सांबरे

30.09.2020

Comments

Popular posts from this blog

खरा मित्र ज्ञानदेव

कविता - मला माणूस पाहिजे

गंगाजल आणि शबरीची उष्टी बोरे