Posts

खरा मित्र ज्ञानदेव

 माझं बालपण आणि सातवी पर्यंत चे शिक्षण झरेकाठी या निसर्गरम्य गावात गेलं.मी सहावीत शिकत असताना एक अशी घटना घडली जी मी कधीच विसरू शकणार नाही. माझे आईवडील दोघेही शिक्षक होते आणि आमच्या शाळेची वेळ सकाळी 7.30 ते 10.30 आणि दुपारी 2.30 ते 5.30 अशी असायची. माझ्या वर्गात तीस विद्यार्थी होते पण ज्ञानदेव खंडोबा वाणी हा माझा सर्वात जवळचा आणि शाळेतील एकमेव मित्र होता. त्याचे घर शाळेपासून खूप दूर बिबाई च्या डोंगराच्या पायथ्याशी होते,घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती. तो सकाळीच त्याचा जेवणाचा डबा घेऊन यायचा आणि दुपारी रोज आमच्या घरी थांबायचा. मग दुपारी आम्ही आमच्या घरी बरोबर जेवायचो,अभ्यास करायचो आणि खेळायचो.तसा तो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता,कारण मला लवकर चार वर्ष वय असताना शाळेत घातले होते. माझा लहान भाऊ हेमंत उर्फ सोन्या तेव्हा दुसरीत होता.त्याला 9 वाजता चहा कम्पल्सरी लागायचा,आणि नाही मिळाला तर खूप रडायचा . आणि चालत जायचे म्हटले  आमचे घर शाळेपासून दहा मिनिटांवर होते,त्यामुळे मधल्या वीस मिनिटांच्या सुट्टीत घरी जाऊन सोन्याला चहा पाजून आणणे आईला शक्य नसायचे.मग ती कामगिरी मी आणि ज्ञा...

वाचनाचे वेड

 पुस्तकाची गोडी लागू दे मनाला वाचनाचे वेड लागू दे मनाला !! वेड वाचनाचे करील शहाणे ज्ञान हीच शक्ती येते पुस्तकाने  संस्कृतीचा ठेवा वाढत चालला  वाचनाचे वेड लागू दे मनाला || १ || धर्म विज्ञान इतिहास भाषा पुस्तकाने भारले महाराष्ट्र देशा ज्ञान असे आहे धन,जात नाही चोरीला वाचनाचे वेड लागू दे मनाला || २ || ग्रंथ हेच गुरु जुनी आहे उक्ती वाया नाही जात पुस्तकाची भक्ती सुशिक्षित ज्ञानी जनता पुढे नेईल देशाला वाचनाचे वेड लागू दे मनाला || ३ || सुहास सदाशिव सांबरे दिशा भूमी रेसिडेन्सी, नवले ब्रीज जवळ आंबेगाव बुद्रुक पुणे ४११९४६ मो. 8308150800

गंगाजल आणि शबरीची उष्टी बोरे

 शबरीने जेव्हा रामासमोर खाण्यासाठी बोरे ठेवली तेव्हा अरे हाड,असली उष्टी बोरे आम्ही खात नसतो असे न म्हणता रामाने ती उष्टी बोरे आनंदाने खाल्ली. ते पाहून शबरीला अपार आनंद झाला,आपले जीवन धन्य झाले असे वाटले. त्याच क्षणी एक सर्वसामान्य मानव असलेला राम भगवान श्रीराम झाले. कारण त्यांनी ती बोरं उष्टी आहेत हे पाहिले नाही तर त्यामागे शबरीची भक्ती,श्रद्धा  कष्ट पाहिले. लेखक - सुहास सांबरे 

EVM चा गडबड घोटाळा

 जुनी म्हण नाचता येईना अंगण वाकडे नवीन म्हण जिंकता येईना EVM हॅकडे 

मी मात्र अपात्र ठरलो नाही

                 मी मात्र अपात्र ठरलो नाही. सध्या विनेश फोगट यांच्या अपात्र होण्यावरून बरीच चर्चा सुरू आहे, ज्यादा वजन गट मधून कमी वजन गटात भाग घेतला,फायनल मध्ये थोडे वजन जास्त भरले  आणि ऑलिम्पिक समितीने त्यांना अपात्र घोषित केले आणि आपले खात्रीने मिळणारे गोल्ड मेडल गेले असा दुर्दैवी प्रसंग घडला . त्यावरून मला माझी लहानपणी ची एक गंमत आठवली ज्यात मी सुद्धा असा प्रकार केला होता. तेव्हा मी झरेकाठी या गावी इयत्ता चवथी मध्ये शिकत होतो.एकदा माझे वडील मला आमच्या मूळ गावी उंबरीला घेऊन गेले.असंच एकदा दुपारच्या वेळी आमचे आजोबा मला शाळेबद्दल विचारू लागले आणि म्हणाले की झरेकाठी पेक्षा आमच्या उंबरीच्या शाळेतील मुलं जास्त हुशार आहेत.मी मान हलविली आणि गप्प बसलो. मी अजिबात चिडलो नाही हे पाहून आजोबा मला परत म्हणाले की चल तुला इथल्या शाळेत घेऊन जातो,वर्गात गुरुजी तुझी परीक्षा घेतील, मग बघू तू किती हुशार आहे? सांग तू कितवीत आहे म्हणजे आपण त्या वर्गात जाऊ.      माहीत नाही मला अचानक त्या एवढ्या लहान वयात ही आयडिया कशी सुचली,मी एक वर्ग कमी म्हण...

माझं मत वाया नाही गेलं

 माझं मत वाया नाही गेलं मागील कितीतरी पिढ्या मातीच्या कुडाच्या घरात राहिलेल्या कित्येक कुटुंबानी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःचं पक्क  घर बांधले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत अजिबात वाया नाही गेलं अंधार पडल्याशिवाय ती घराबाहेर त्यासाठी पडू शकत नव्हती तिच्यासाठी जेव्हा घरोघरी शौचालय बांधून तिला सुविधा आणि सुरक्षा मिळाली  तेव्हा लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं गरीब, अशिक्षित व्यापारी पेमेंट साठी इंटरनेट,वायफाय कुठून आणणार अशी खिल्ली उडवली गेली तरी आज भारत डिजिटल पेमेंट करण्यात जगात एक नंबर देश झालेला पाहिला  तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं शहरात बॉम्ब हल्ले झाले,गोळीबार झाले,सीमेवरून तरुण हुतात्म्यांचे शव आले की खूप दुःख व्हायचे. अश्या बातम्यांचे प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं रस्ते चकचकीत झाले,बस प्रवास स्वस्त झाले,शेतमाल वाहतूक वेगवान झाली दूर गावी राहणारी मुले आईवडिलांना,आईवडील मुलांना भेटायला पुन्हा पुन्हा येऊ लागली तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गे...

माझं मत अजिबात वाया नाही गेलं

 माझं मत वाया नाही गेलं मागील कितीतरी पिढ्या मातीच्या कुडाच्या घरात राहिलेल्या कित्येक कुटुंबांनी जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःचं पक्क  घर बांधले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मत वाया नाही गेलं अंधार पडल्याशिवाय ती घराबाहेर त्यासाठी पडू शकत नव्हती तिच्यासाठी जेव्हा घरोघरी शौचालय बांधून तिला सुविधा आणि सुरक्षा मिळाली  तेव्हा लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं गरीब, अशिक्षित व्यापारी पेमेंट साठी इंटरनेट,वाय फाय कुठून आणणार अशी खिल्ली उडवली गेली आणि आज भारत डिजिटल पेमेंट करण्यात जगात एक नंबर देश झालेला पाहिला  तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं शहरात बॉम्ब हल्ले झाले,गोळीबार झाले,सीमेवरून तरुण हुतात्म्यांचे पार्थिव आले की खूप दुःख व्हायचे अश्या बातम्यांचे प्रमाण जेव्हा खूप कमी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं माझं मत अजिबात वाया नाही गेलं रस्ते चकचकीत झाले,शेतमाल वाहतूक वेगवान झाली,बस प्रवास स्वस्त झाले दूर गावी राहणारी मुले आईवडिलांना,आईवडील मुलांना भेटायला पुन्हा पुन्हा येऊ लागली तेव्हा माझ्या .... माझ्या देशावर जे शत्रू हल्ला करायच...